नवी दिल्ली – भारतात होणाऱ्या जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने जी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे त्यावर प्रेसिडेंट ऑफ इंडिया या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत या शब्दांचा वापर करण्यात आल्याने वादविवाद सुरू झाला आहे भारतानेही आपले नाव इंडिया वरून भारत केले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे जेव्हा कोणत्या देशामध्ये असा नाव बदलण्याचा विषय समोर होतो तेव्हा असा वाद निर्माण होत असतो मुळात भारताचे नाव बदलण्याचा हा विषय नाही कारण इंग्लिशमध्ये भारताला इंडिया असे म्हटले जाते
पण आतापर्यंत जगाच्या पाठीवरील सात देशांनी आपली बदलली असून त्याला काही राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक कारणे जबाबदार आहेत भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेने 1973 मध्ये सिलोन हे नाव बदलून देशाचे नाव श्रीलंका असे केले होते आपल्या देशावरील वसाहतवादाचा शिक्का पुसून टाकण्यासाठी श्रीलंकेने सिलोनला पूर्णविराम देऊन श्रीलंका हे सांस्कृतिक नाव स्वीकारले होते
1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती होईपर्यंत तो प्रदेश पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता पण संपूर्ण पाकिस्तानची फाळणी होऊन स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाल्यावर मात्र पूर्व पाकिस्तानचे नाव बांगलादेश असे करण्यात आले पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानचे संस्कृती पूर्णपणे भिन्न असल्यानेच त्या आधारे हा निर्णय घेण्यात आला झेकोसलावकीया या देशाचे नावही देशाचे दोन तुकडे झाल्यावर बदलण्यात आले 1993 मध्ये झेकोसलावकीयाचे तुकडे होऊन झेक रिपब्लिक आणि स्लोव्हाकिया या दोन देशांची निर्मिती करण्यात आली आणि या दोन देशांना हीच दोन नावे देण्यात आली
1939 पर्यंत थायलंड हा देश सयाम या नावाने ओळखला जात होता पण त्यानंतर सयामला थायलंड असे नाव देण्यात आले पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेला हा प्रदेश थायलंड या नावानेच लोकप्रिय आहे भारताचा आणखीन एक शेजारी असलेल्या ब्रह्मदेशचे नाव बदलून ते म्यानमार असे करण्यात आले आहे त्यामध्ये काही राजकीय आणि क्रांतिकारी कारणे आहेत ब्रह्मदेशमधील लष्करी प्रशासनाने ब्रह्मदेश हे नाव बदलून म्यानमार या नावाचा स्वीकार केला आहे आज हा देश आता याच नावाने ओळखला जातो
1997 मध्ये आफ्रिका खंडातील जझैरे या देशाने आपले नाव बदलून डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कोंगो हे नाव स्वीकारले होते
सर्वात ताजे नामांतर 2019 मध्ये घडले जेव्हा रिपब्लिक ऑफ मेस्सीडनिया या देशाने आपले नाव बदलून नॉर्थ मेसिडनीया असे केले देशांचा नाव बदलण्याचा इतिहास असा समोर असतानाच भारताच्या नामांतराची चर्चा सुरू आहे पण मुळात भारतीय घटनेमध्येच इंडिया दॅट इज भारत असाच उल्लेख असल्यामुळे अनेक परकीय देश फक्त भारताचा उल्लेख इंडिया असा करतात अन्यथा भारतामध्ये भारताचा उल्लेख भारत असाच केला जातो