मुंबई – जालना : राज्य सरकार मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेणाऱ्या जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावातले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाने आज (५ सप्टेंबर) मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी या गावात (उपोषणाचं ठिकाण) जाऊन भेट घेतली. मात्र जरांगे-पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच त्यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी आणखी ४ दिवसांचा वेळ दिला आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे मराठा आरक्षणासाठी तरूणाने आत्महत्या केली आहे.
एक्स ( ट्वीटर ) अकाउंटवर राष्ट्रवादी काँग्रेसने धक्कादायक पोस्टशेअर केली आहे.’मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ असे म्हणत तरुणाची तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याचे या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे’
“मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे” असे म्हणत तरुणाची तलावात उडी टाकून आत्महत्या..!!
धाराशिव जिल्ह्यातील माडज येथील किसन चंद्रकांत माने या तरुणाने, “मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे” अशी घोषणा ठोकत गावातील तलावात उडी टाकून आत्महत्या केली. आता या घटनेला जवाबदार कोण ? सरकार अजून मराठा…
— NCP (@NCPspeaks) September 6, 2023
पोस्टमध्ये लिहिण्यात आले की,’“मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे” असे म्हणत तरुणाची तलावात उडी टाकून आत्महत्या..!! धाराशिव जिल्ह्यातील माडज येथील किसन चंद्रकांत माने या तरुणाने, “मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे” अशी घोषणा ठोकत गावातील तलावात उडी टाकून आत्महत्या केली. आता या घटनेला जवाबदार कोण ? सरकार अजून मराठा समाजाची किती परीक्षा बघणार आहे ? शांततेच्या मार्गाने हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी मोर्चा काढणाऱ्या सर्वसामान्य मराठा समाजावर लाठीचार्ज करतात. हेच आहे का सर्वसामान्यांच्या हक्काचे सरकार ? अजून किती दिवस हा अन्याय सर्वसामान्यांवर लादला जाणार आहे ? फक्त चर्चा करून तोडगा निघत नसतो त्यासाठी निर्णय देखील घ्यावा लागतो. आता काय अजून असे किती बळी जातील याची सरकार वाट बघत आहे का ? सर्वसामान्यांचे बळी जातील तेव्हा मराठा आरक्षण मिळणार आहे का ? आता तरी सरकारला जाग यायला हवी आणि मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण हे मिळायलाच हवे.’ असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.