Ravi Jadhav : मराठी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांचीओळख आहे. त्यांनी ‘नटरंग’, ‘टाइमपास’ आणि ‘बालगंधर्व’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या ‘ताली’ या सुष्मिता सेनच्या वेबसीरिजची प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर आता रवी जाधाव यांनी मुलगा अंश जाधव याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. रवी आणि मेघना जाधव यांच्या मुलाने अंशने कॅनडातील कॉलेजमधून डिजीटल फ्युचर्समध्ये पदवी मिळवली आहे. त्यानिमित्त रवी जाधवने ही पोस्ट शेअर केली आहे.
रवी जाधव यांनी मुलासोबतचा फोटो पोस्ट करत लिहिले की, “पालकांसाठीचा अभिमानाचा क्षण! माझ्या मुलाने नुकतीच OCAD युनिव्हर्सिटी, कॅनडातून डिजीटल फ्युचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन (ऑनर्स) पदवी पूर्ण केली आणि आम्ही याच्यापेक्षा जास्त आनंदी असू शकत नाही. त्याला ही उत्कृष्ट कामगिरी करताना आणि त्याचं ध्येय साध्य करताना पाहणं हा एक अविश्वसनीय प्रवास होता. इथे त्याच्यासमोर आयुष्याचा पुढचा मोठासा प्रवास आहे आणि खूप चांगल्या संधी त्याची वाट बघत आहे.” त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोबतच अनेकांनी अंशचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, रवी जाधव यांचे ‘बालगंधर्व’, ‘टाईमपास’, ‘बालक पालक’, ‘बेन्जो’, ‘कच्चा लिंबू’, ‘नटरंग’ असे अनेक चित्रपट हे गाजले आहेत. रवी जाधव यांच्या ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे.