अहमदाबाद – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सरकारी शाळांमध्ये जी सुधारणा केली आहे, ते अन्य राजकीय पक्षांना गेल्या 70 वर्षांत करता आले नाही. अशा व्यक्तीला भारतरत्न दिले जाण्याची गरज असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
केजरीवाल म्हणाले की आज संपूर्ण देशाचे शिक्षण क्षेत्र सिसोदिया यांच्याकडे सोपवले जाण्याची गरज आहे. मात्र तसे न करता त्यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाचे अर्थात सीबीआयचे छापे टाकले जात आहेत. गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. त्यामुळे या लोकांमध्ये अहंकार आला आहे. त्यामुळे गुजरातची जनता दु:खी आहे. आम आदमी पक्ष जनतेच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करतो आहे. लोकांना आम्ही शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधांची गॅरेंटी देण्यासाठी आलो आहोत.
केजरीवालांच्या गुजरातमध्ये घोषणा
* गुजरातमधील प्रत्येक मुलाला मोफत आणि दर्जेदार शिक्षण देणार
* शिक्षणाचा दर्जा उंचावणार
* शिक्षकांची संख्या वाढवणार
* खासगी शाळांना मनमानी पध्दतीने फी वाढ करू देणार नाही
* शहीद पोलिसांच्या कुटुंबांना 1 कोटी रूपये देणार
* सरकार बनवल्यावर गेल्या पाच वर्षांत शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांना आम्ही 10 दिवसांत ही मदत देऊ
* सगळ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा आणि मोफत उपचार देणार
* प्रत्येक गावात आणि वॉर्डमध्ये मोहल्ला क्लिनिक सुरू करणार
* सरकारी रूग्णालयांची अवस्था सुधारणार, नवी रूग्णालये सुरू करणार
* अपघातात जखमी झालेल्यांवर मोफत उपचार करणार
* गूजरातमधील दारबंदी कायम ठेवणार, मात्र बेकायदा दारुधंदा रोखणार
* भाजपने यातूनच दहा हजार कोटी रूपये कमावले