नवी दिल्ली : देशातील तिसरी लाट ही आता काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. मात्र असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका देशात असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी योग्य ती उपाय योजना आखण्यात येत आहे. यालाच आता काँग्रेसकडून एक हात मदतीचा म्हणत पक्षाकडून श्वेतपत्रिका सादर करण्यात आली आहे.
करोना संकट हाताळण्यावरुन सतत मोदी सरकारवर टीका करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी चक्क सरकारच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. राहुल गांधी यांनी करोना संकटाचा सामना कऱण्यासाठी पक्षातर्फे श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. यावेळी त्यांनी केंद्रावर टीका करण्याचा हेतू नसून संभावित तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशाला मदत करण्यासाठी ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध केल्याचे सांगितले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
The aim of this white paper on COVID19 is not finger-pointing at the government but to help the nation prepare for the third wave of infection. The whole country knows that a third wave will strike: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/5wgsBpj3jk
— ANI (@ANI) June 22, 2021
“संपूर्ण देशाला तिसरी लाट येणार असल्याचे माहित आहे. सरकारने त्यासाठी तयार राहावे असा आमचा आग्रह आहे,” असे राहुल गांधींनी सांगितले आहे. “श्वेतपत्रिकेचा हेतू सरकारकडे बोट दाखवत टीका करण्याचा नसून देशाला संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यात मदत करण्याचा आहे,” असे राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसऱ्या लाटेचा सामना करताना नेमक्या काय चुका झाल्या याची संपूर्ण माहिती यामध्ये असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.
Rahul Gandhi releases white paper on Covid, aiming to help prepare for third wave
Read @ANI Story | https://t.co/gSCupCWzFL pic.twitter.com/ewDXXrXaxW
— ANI Digital (@ani_digital) June 22, 2021
“पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत करोनाशी लढताना करणण्यात आलेले व्यवस्थापन वाईट होते. यामाग अनेक कारणं होती. आम्ही ती कारण या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरी लाट आल्यास नेमके काय करावे सांगणारी ही ब्ल्यूप्रिंट आहे,” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
“करोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ९० टक्के लोकांचा जीव वाचवता आला असता. यामागचं सर्वात मोठं कारण ऑक्सिजनचा तुटवडा होतं. सध्या देशात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. पंतप्रधानांचे अश्रू लोकांचे जीव वाचवू शकत नाही पण ऑक्सिजन वाचवू शकतो”.असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
It's clear that management of the first & second wave of COVID was disastrous, & we've tried to point out the reasons behind it. I would even go so far as to say that there might be waves even after the third wave of COVID19 as the virus is mutating: Rahul Gandhi, Congress
— ANI (@ANI) June 22, 2021
“तिसरी लाट येणार हे स्पष्ट आहे. विषाणू सतत बदलत असून सरकारला पुढील मार्ग सुचवावा हाच या श्वेतपत्रिकेचा हेतू आहे. आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली असून हे चार खांब विकसित केले आहेत,” असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. “यामध्ये लसीकरण हा मुख्य खांब आहे. आक्रमकपणे आणि १०० टक्के लसीकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. सरकार पूर्णपणे तयार असलं पाहिजे. रुग्णालयं, ऑक्सिजन, औषधं या सर्व गोष्टी उपलब्ध असलं पाहिजे,” असा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे.
90% of people who have died could have been saved. The biggest reason for this was the lack of oxygen at the time. While there is no shortage of oxygen in the country. PM's tears did not save the lives of people but oxygen could have: Rahul Gandhi, Congress
— ANI (@ANI) June 22, 2021
“तर दुसरा खांब श्वेतपत्रिका आहे ज्यामध्ये रुग्णांसाठी गरज असणारी औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड्स उपलब्ध आहेत याची खातरजमा करणं आहे. तिसऱ्या लाटेसाठी सरकारने तयार असणं गरजेचं आहे यावर जोर देताना राहुल गांधी यांनी याचा अर्थ दुसऱ्या लाटेत झालेल्या चुका समजून घेत त्या दुरुस्त करणं,” असल्याचे म्हटले आहे.