Bus Fire : मुंबई गोवा महामार्गावर बस दुर्घटना टळली आहे.मिळलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून ही बस मुंबईकडे जात असतांना महाडजवळील सावित्री नदीवरील पुलाजवळ बसच्या टायरला आग लागल्यामुळे पेट घेतला. या या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. यादरम्यान सुदैवाने बसच्या टायरला आग लागली असताना बसमधून प्रवास करत असलेल्या एका विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवली. बसमधून प्रवास करत असलेल्या १९ प्रवाशांसह एकूण २२ जणांचे प्राण वाचले.
या बसमधून ऐकून १९ प्रवासी प्रवास करत होते. तर दोन ड्रायव्हर आणि एक क्लिनर असे मिळून २२ प्रवासी होते. अशात रात्री रात्री पावणे दोनच्या सुमारास बसने पेट घेतला. यावेळी आर्यन भाटकर नावाचा विद्यार्थाला याबाबत कळताच त्याने प्रसंगावधान दाखवत याबाबत माहिती त्याने इतर सर्व प्रवाशांना दिली.
बसचा टायर पेटत असत्याचे लक्षात येताच त्याने इतर प्रवाशांना त्याची कल्पना दिली आणि वेळीच सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आर्यन भाटकर हा मुंबईत शिक्षण घेत आहे. दरम्यान, या दुर्घटनेमधून सर्व प्रवासी सुदैवाने बचावले. मात्र बसला लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचं सामान जळून खाक झालं आहे.