Hardik Joshi: ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता हार्दिक जोशी अर्थात राणादा नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या राणादा ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका निभावत आहे. हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. यानंतर हार्दिक स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसणार आहे. यापूर्वी तो या मालिकेत दिसला होता. मात्र आता मालिकेत मोठा ट्वीवस्ट येणार असून हार्दिकची यात पुन्हा एकदा एन्ट्री होणार आहे.
मोनिकाला प्रेमपत्र लिहिणारा सनी म्हणजे स्वत: शुभंकर असल्याचा खुलासा तो करणार आहे. त्यामुळे शुभंकरच्या रुपात मोनिकाच्या आयुष्यात पुन्हा नवं वादळ आलं आहे. एकीकडे वैदेहीच्या मृत्यूला मोनिकाच जबाबदार असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड होणार आहे. तर, दुसरीकडे मोनिकासाठी सनी नावाच्या व्यक्तीने लिहिलेली प्रेमपत्र मल्हारच्या हाती लागणार आहेत. त्यामुळे मल्हार-मोनिकाच्या नात्याबाबत पुढे काय होणार ? हे या मालिकेत आता पाहायला मिळणार आहे.
हार्दिक जोशीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तुझ्यात जीव रंगला या मालिकेत तो राणादा ही भूमिका साकारत होता. त्यानंतर त्याने तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, अघोरी, दुर्व, राजा शिवछत्रपती या मालिकांमध्ये देखील हार्दिकने काम केले आहे. आता हार्दिकला ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांचे खऱ्या आयुष्यातही एकमेकांवर प्रेम जडले आणि 2 डिसेंबर 2022 रोजी दोघे लग्न बंधनात अडकले होते.