पुणे – पुरेशी झोप न होणे आणि झोपेच्या वेळा निश्चित नसणे ही गोष्ट आरोग्यावर मोठा गंभीर परिणाम करत असते. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला हवा, पाणी आणि अन्न यांची गरज असते त्याप्रमाणे सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोपही गरजेची असते. त्यामुळे चांगली झोप मिळण्यासाठी मेंदू प्रमाणे पोटाला देखील आराम मिळणे महत्वाचे आहे.
भात – रात्रीच्या वेळी भात खाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी निर्माण होण्याची शक्यता असते. रात्री भात खाल्ल्याने पोटाकडील चरबी वाढते. त्यामुळे रात्री जेवताना भात खाणे टाळावे.
फास्ट फूड व तेलकट पदार्थ – पिझ्झा, बर्गर, फ्राईज यासारखे फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ रात्रीच्या वेळी खाणे टाळा. अपचन किंवा अॅसिडिटीमुळे निद्रानाश होऊ शकतो.
चॉकलेट – काही जणांना रात्री जेवण झाल्यावर गोड खाण्याची सवय असते.त्यामुळे बऱ्याच वेळा चॉकलेट खाल्लं जातं. चॉकलेट्समध्ये काही प्रमाणात कॅफेन असते. तेव्हा रात्रीच्या वेळी चॉकलेटच्या अतिसेवनामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
मांसाहारी पदार्थ – रात्रीच्या वेळी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. कारण, मांस पचायला २४ ते ७२ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे तुमचे वजन वाढते.