इस्लामाबाद – पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला इम्रान खान सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचा स्वीकार पाकिस्तान सरकारमधील मंत्र्याने केला. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादविरोधी बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. इम्रान खान सरकारमध्ये मंत्री असलेले फवाद चौधरी यांनी याबाबत भाष्य करताना, ‘पुलवामा हल्ला पाकिस्तान सरकारचे यश असून याचे श्रेय पंतप्रधान इम्रान खान यांना द्यायला हवे’ असं वक्तव्य केलं.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला होता. भारतातर्फे याबाबतचे अनेक पुरावे सादर करण्यात आले होते. मात्र पाकिस्तानने इतर दहशतवादी हल्ल्यांप्रमाणेच या हल्ल्यावेळीही पाकिस्तानचा याशी काहीही संबंध नसल्याचं म्हंटलं होत. मात्र फवाद चौधरींच्या वक्तव्यामुळे आता हा हल्ला पाकिस्ताननेच घडवून आणल्याचं स्पष्ट झालंय.
दरम्यान, भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान जेंव्हा पाकिस्तानच्या ताब्यात सापडले होते, तेंव्हा जर पाकिस्तानने त्यांची सुटका केली नसती तर भारताने पाकिस्तानवर हल्लाच केला असता अशी भीती पाकिस्तानातील वरिष्ठ नेत्यांना वाटायला लगली होती.
या भीतीमुळे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांचेही पाय लटपट कापायला लागले होते. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जनरल बाजवा आणि कुरेशी यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची तातडीने सुटका करण्याची आग्रही मागणी लावून धरली होती. अशी माहिती पाकिस्तानातील वरिष्ठ विरोधी नेते आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे नेते सरदार अयाझ सादिक यांनी वृत्तसंस्थेला दिली.
पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे नेते सरदार अयाझ सादिक यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानात इम्रान खान यांच्यावर टीका होऊ लागली आहे. अशातच फवाद चौधरी यांनी इम्रान खान यांच्या बचावात पुढे येत पुलवामाबाबतची हकीकत सांगितली आहे. यावेळी चौधरी यांनी, पाकिस्ताननेच भारतामध्ये घुसून मारल्याचा फुटकळ दावाही केला.
Pakistan accepts role in Pulwama attack, hails it as achievement under Imran Khan government
Read @ANI Story | https://t.co/7rtOXEJfaq pic.twitter.com/E0Wcz1TLBV
— ANI Digital (@ani_digital) October 29, 2020