मुंबई – केंद्रिय मंत्री नीर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षाचा बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा काल जाहीर करताच महाविकास विकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर सडकुन टीका केली आहे. भाजपच्या या जाहीरनाम्यात ‘बिहारमध्ये सत्ता मिळाल्यास सर्वांना करोनाची लस मोफत दिली जाईल’, अशी घोषणा करणाऱ्यात आली आहे.
दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फायर ब्रँड नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड’ यांनी ट्विट करून भाजपच्या आश्वासनाचा पंचनामा केला आहे.
निवडणूकीच्या प्रचारामध्ये मतं मागण्यासाठी आम्ही तुम्हांला कोरोनाची लस फुकट देऊ हे सांगणं म्हणजे माणुसकिची नीचोत्तम पातळी गाठण्यासारखं आहे.
निस्वार्थपणे लोकांच्या जीवाची रक्षा करणे हि सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.
त्यासाठी मतं मागणं हा माझ्या अंदाजाने आचारसंहितेचाही भंग आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 22, 2020
“निवडणूकीच्या प्रचारामध्ये मतं मागण्यासाठी आम्ही तुम्हांला कोरोनाची लस फुकट देऊ हे सांगणं म्हणजे माणुसकिची नीचोत्तम पातळी गाठण्यासारखं आहे. निस्वार्थपणे लोकांच्या जीवाची रक्षा करणे हि सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी मतं मागणं हा माझ्या अंदाजाने आचारसंहितेचाही भंग आहे. असं आव्हाड म्हणाले.