पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीला रंजक तडका देणारे थीमसॉंग कॉंग्रेसने तयार केले आहे. ‘बोले बिहार, बदले सरकार’ असे त्या गाण्याचे शीर्षक आहे. कॉंग्रेसचे प्रचारगीत पक्षाच्या सोशल मीडिया विभागाने तयार केले आहे.
WATCH: Nitish Kumar Chor hai: Nitish faces protest at his public rally in Aurangabad’s Rafiganj constituency.
Protestors shout “Nitish chor hai” slogans while he was speaking on the stage.
Various JDU mantris have been facing protests and anger of voters this election. pic.twitter.com/YXmcSE9Ziy
— Prashant Kumar (@scribe_prashant) October 19, 2020
सध्या या प्रचारगीताची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असतांना पुन्हा “नितीश कुमार चोर है, नितीश कुमार चोर है। मनरेगा का पैसा खाया है।” अशा घोषणांचा व्हिडियो व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांच्या बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील रफीगंज येथे मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा सुरु होती. मुख्यमंत्री मतदारांना संबोधित करत असतानाच अचानक समोरच्या गर्दीमधून एकजण, “नितीश कुमार चोर है, नितीश कुमार चोर है। मनरेगा का पैसा खाया है।” अशा घोषणा देऊ लागला.
यावेळी, पोलिसांनी या व्यक्तीला सभेच्या ठिकाणाहून बाहेर नेलं आणि सभा पुन्हा सुरु झाली. महारेगासंदर्भातील (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) कामांबद्दल या व्यक्तीची नाराजी असल्याचे समजते.
दरम्यान, बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे रिपोर्ट कार्ड बनवले आहे. यानुसार नितीशकुमार यांनी 2015 मध्ये जाहीर केला होता. त्यात बिहारमध्ये 2.7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करू. त्यातून पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि कौशल्य विकास पाच वर्षात घडवू, असे आश्वासन दिले होते. मात्र दहा लाख जणांना रोजगार देण्याचे आश्वासन तेजस्वी यादव यांनी दिले आहे. त्यावरून बेरोजगारी प्रमाण भयावह असल्याचे उघड आहे.