नवी दिल्ली – भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार आहे किंवा फक्त हिंदूचेच म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे आपल्या राज्यघटनेत म्हटलेले नाही. कारण आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती म्हणजे हिंदू आहे, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. तसेच भारतीय मुस्लीमजगात सर्वाधिक समाधानी असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते. मोहन भागवत म्हणाले, भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत. एवढेच नव्हे तर देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येतात. ज्यांच्या स्वहिताला बाधा निर्माण होते तेव्हाच कट्टरतावाद आणि फुटीरतावाद पसरविला जातो, असेही त्यांनी सांगितले.
एखाद्या देशावर राज्य करणारा विदेश धर्म अजूनही अस्तित्वात आहे असे उदाहरण फक्त भारतात बघायला मिळते. भारताने अन्य धर्मीय अनुयायांना हक्क दिले, तसे पाकिस्तानने दिले नाहीत आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश निर्माण केला, असे त्यांनी नमूद केले. यावेळी अयोध्या राममंदिरासंबंधी बोलताना ते राष्ट्रीय भावनांचे मंदिर आहे, मानवतेचे मंदिर आहे, असे त्यांनी सांगितले.