नवी दिल्ली – कंपन्यांना आपले काम पूर्ण करण्यासाठी दिलेल्या मुदतीत केंद्र सरकारने 31 डिसेंबर पर्यंत वाढ केली आहे. अगोदर ही कामे सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करायची होती.
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार कंपन्यांना वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 31 डिसेंबर पर्यंत घेता येईल. नव्या स्वतंत्र संचालकांना त्यांची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
विविध अहवालाच्या सादरीकरणासाठी आता विलंब शुल्काशिवाय हे अहवाल 31 डिसेंबरपर्यंत सादर करता येतील. अर्थमंत्रालयाने नादारी आणि दिवाळखोरी संहितेच्या अंमलबजावणीला मर्यादित काळासाठी स्थगिती दिली आहे.