नगर (प्रतिनिधी) – नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना या संसर्गाची लागण होत असून, आज 867 नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आज मितीस एकूण बाधितांची संख्या 24 हजार 203 वर पोहचली आहे.
दरम्यान, आज जिल्ह्यात 549 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 20 हजार 510 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 84.74 टक्के इतके झाले आहे, तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 344 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 282, अँटिजेन चाचणीत 322 आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 263 रुग्ण बाधित आढळले.
यामध्ये मनपा 195, संगमनेर 10, राहाता 1, पाथर्डी 5, नगर ग्रामीण 22, श्रीरामपूर 1, कॅन्टोन्मेंट 6, नेवासे 2, श्रीगोंदा 11, पारनेर 3, राहुरी 2, शेवगाव 13, कोपरगाव 6, कर्जत 1, इतर जिल्हा 4, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 322 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 62, राहाता 40, पाथर्डी 43, श्रीरामपूर 12, कॅन्टोन्मेंट 9, नेवासे 46, श्रीगोंदा 22, पारनेर 19, राहुरी 5, शेवगाव 16, कोपरगाव 11, जामखेड 21 आणि कर्जत 16, अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 263 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 80, संगमनेर 14, राहाता 35, पाथर्डी 5, नगर ग्रामीण 19, श्रीरामपूर 30, कॅन्टोन्मेंट 7, नेवासे 26, श्रीगोंदा 3, पारनेर 22, अकोले 1, राहुरी 9, शेवगाव 2, कोपरगाव 5, जामखेड 4 आणि कर्जत 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 549 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा 239, संगमनेर 36, राहाता 28, पाथर्डी 14, नगर ग्रामीण 15, श्रीरामपूर 39, नेवासे 29, श्रीगोंदा 13, पारनेर 15, अकोले 8, राहुरी 16, शेवगाव 20, कोपरगाव 34, जामखेड 15, कर्जत 15, मिलिटरी हॉस्पिटल 13, अशा रुग्णांचा समावेश आहे.करोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावा, आजाराची लक्षणे आढळताच तत्काळ जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन तपासणी करून घ्या, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
24 तासांत 19 करोनाबाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात आज गेल्या 24 तासांत 19 करोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. काल (दि.3) 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता बाधित रुग्णांची संख्या जशी वाढत आहे, तसेच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले असल्याचे समोर येत आहे.
जिल्ह्यात “चेस दी व्हायरस’ मोहीम गतिमान
जिल्ह्यात “चेस दी व्हायरस’ मोहीम गतिमान करण्यासाठी ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध बाबींना जिल्ह्यात परवानगी दिली आहे. मात्र, त्याचबरोबर करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळेच महानगरपालिका क्षेत्र आणि प्रत्येक तालुक्यात अधिकाधिक चाचण्या घेऊन रुग्णांपर्यंत पोहोचता यावे व संसर्गाची साखळी तुटावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.