चिंबळी -खेड तालुक्याच्या दक्षिण भागागांतील गावांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावासाची रिपरिप सुरू असल्याने भात पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली असून पीक हिरवेगार झाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे.
चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ परिसरात चार ते पाच दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली असल्याने विहिरींसह इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, वाल, मूग, उडीद, चवळीसह इतर पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरत असल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे.