– नवनाथ बोरकर
डोर्लेवाडी (प्रतिनिधी) : संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटाने वेढलेले आहे. या कोरोना व्हायरसचा समूळ नाश करण्यासाठी युद्धपातळीवर शास्त्रज्ञांकडून लस शोधण्याचा प्रयत्न सुरू असून, कोरोनाला रोखण्यात अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही. कोरोनाचा देशातून नायनाट व्हावा यासाठी सीताराम दास महाराज हे देहू ते पंढरपूर दरम्यान दंडवत घालत निघाले आहे.
महाराज देहू मधून दि. १९ मार्चला दंडवत घालत निघाले असून, रोज पहाटे तीन वाजल्यापासून दंडवत घालण्यास सुरवात करून सुर्यादायापर्यंत सुमारे चार तासांत २००० दंडवत घालतात. सध्या ते आज दंडवत घालत कोरोनाचे संकट दूर व्हावे, आपल्या देशातून कोरोनाव्हायरस नष्ट होण्याचे कार्य सुरू असून हे महाराज संन्याशी आहेत. त्यांचे गुरुस्थानी भीमाशंकर येथे आहे.
कोणी मुलाबाळांच्या भविष्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून देवाला शरण जाऊन जगले पाहिजे असा निश्चय दंडवत घालत निघालेल्या सिताराम दास महाराज यांनी यावेळी व्यक्त केला आहे.