मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’ने आत्महत्या केल्याला एक महिन्याहून अधिक काळ झाला. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. सुशांतच्या फॅन्स च्या मते ही आत्महत्या नसून इंडस्ट्री मधील लोकांच्या दबावाखाली येऊन झालेला खून आहे असे म्हंटले जातेय.
अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत. आत्तापर्यंत 30 हून अधिक लोकांची चौकशी पोलिसांनी केली आहे. अश्यातच बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री ‘कंगना राणावत’ने हिंदी सिनेसृष्टीवर अनेक गंभीर आरोप केले.
दरम्यान, कंगनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे अनेक कलाकारांनी तिचा विरोध देखील केला. मात्र अभिनेते व राजकीय नेते ‘शत्रुघ्न सिन्हा’ यांनी कंगनाला पाठिंबा दिला आहे. एका मुलाखतीत त्यांनी कंगना विषयी आपलं मत मांडलं आहे.
“बॉलिवूडमध्ये कोणाच्याही आशीर्वादाशिवाय कंगनाने खूप यश संपादन केलंय. अनेक अडचणींचा सामना करत तीने बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केलं. आता देखील ती फार चांगलं काम करत आहे. तिचं हे यश पाहून लोकांना तिच्याविषयी ईर्षा वाटू लागली आहे. त्यामुळेच खूप लोक कंगनाच्या विरूद्ध बोलतात, किंबहुना ते कंगनाचा विरोध देखील करतात”. असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
कंगना म्हणाली कि, बॉलीवूडमध्ये स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचले जाते, तसेच बॉलीवूडमधील कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची आगपाखड कंगनाने केली.