नवी दिल्ली : जगभरात सध्या करोनामुळे चिंताग्रस्त वातावरण आहे. देशातही भयानक परिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येतही प्रचंड मोठी वाढ झाली आहेत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष सध्या करोना लसीकडे लागले आहे.अशात भाजपाच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी करोना बरा होण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचवला आहे.
करोनामुळे काहीसं भीतीचे वातावरण आहे. प्रसार रोखण्याबरोबरच सरकारकडून उपाययोजनाही केल्या जात आहेत. अशात भाजपाच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विट करून करोना बरा होण्याचा उपाय सूचवला आहे.
आइए हम सब मिलकर कोरोना महामारी को समाप्त करने के लिए लोगों के अच्छे स्वास्थ्य की कामना के लिए एक आध्यात्मिक प्रयास करें आज25 से 5 अगस्त तक प्रतिदिन शाम 7:00 बजे अपने घरों में हनुमान चालीसा का 5 बार पाठकरें5 अगस्त को अनुष्ठान का रामलला की आरती के साथ घरों में दीप जलाकर समापन करें pic.twitter.com/Ba0J2KrkA8
— Sadhvi Pragya singh thakur (@SadhviPragya_MP) July 25, 2020
चला करोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. आजपासून २५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचं पठण करावे. ५ ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा”, असे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.