नगर – शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील काटवन खंडोबा मुख्य रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावून, या भागात परसलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे केली आहे.
यावेळी प्रवीण जाधव, अलीम पठाण, करण वाघीला, साजीद शेख, जावेद पठाण, किरण जरे, याकूब पठाण, वसीम पठाण आदी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 15 मधील काटवन खंडोबा येथे मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमय झाले असून त्यात दुर्गंधीयुक्त पाणी साचत आहे. तर खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत.
तसेच या रस्त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या भागात साथीचे आजार पसरण्याची शक्यता असून, तातडीने कचऱ्याची विल्हेवाट लावावी व काटवन खंडोबा मुख्य रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.