नवी दिल्ली- जगात तसेच भारतात करोना विषाणूचे संकट गडद होत चालले आहे. या धोकादायक विषाणूमुळे भारतात आठ हजारांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. करोना विषाणू संसर्गाच्या प्रसारासाठी जबाबदार असलेल्या चीनवर कारवाई करण्याची मागणी जगभर होत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेसहित अनेक देश चीन विरोधात आहेत.
यादरम्यान, बिहारमध्ये एक खटला दाखल करण्यात आला आहे. याचिकाकर्ता मुराद अलीने बेतिया सीजेएम कोर्टात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक यांच्यासहित इतरांवर खटला दाखल केला आहे.