जयपूर- राजस्थानमध्ये आमदारांच्या फोडाफोडीचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप कॉंग्रेसने सिद्ध करावा, असे आव्हान गुरुवारी भाजपकडून देण्यात आले. राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार विविध आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अपयश झाकण्यासाठी भाजपकडे बोट दाखवले जात आहे.
कॉंग्रेसने 55 वर्षे घोडेबाजाराचा खेळ केला. तोच पक्ष इतरांवर आरोप करत असल्याचे आश्चर्य वाटते. खरेतर, कॉंग्रेसमध्येच अंतर्गत मतभेदांना उधाण आले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी दिली.