नवी दिल्ली – यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखान्याकडे 22 हजार कोटी रुपयांची थकबाकी असून साखर कारखान्यांनी ती लवकर द्यावी अशी सूचना केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी साखर कारखान्यांना केली आहे.
यासंदर्भात त्यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न कसा सोडवावा याबाबत शिफारशी करण्यास सांगितले आहे. 2019-20 या हंगामामध्ये शेतकऱ्यांची साखर कारखान्याकडे एकूण 72 हजार कोटी रुपयांचे येणे होते.
त्यातील बरीच रक्कम आली असून आणखी 22 हजार कोटी रुपये द्यायचे राहिले आहेत. साखर कारखाने सर्वसाधारणपणे राज्य आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या दर उसासाठी देत असतात. त्या आधारावर हे मूल्यांकन करण्यात आले आहे.