नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सव्वा दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. शुक्रवार सकाळपर्यंत आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली . मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 2 लाख 26 हजार 770 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 6348 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 9 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात मागील 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसमुळे 9851 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.भारतात नव्या रुग्णांच्या वाढीचा वेग जगभरातील इतर देशांच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
बुधवारी ब्राझीलमध्ये 27312 आणि अमेरिकेमध्ये 20578 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर रुसमध्ये 8536 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याचाच अर्थ देशातील नव्या रुग्णांच्या वाढीचा वेग जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतात आज 9851 नवे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिका, ब्राझील, रुस, ब्रिटन, स्पेन आणि इटलीनंतर कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.