अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अलिबाग मधील थळ याठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पालकमंत्री अदिती तटकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे देखील गेले असून परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सध्या सुरु आहे. चक्रीवादळाचा मोठा फटका या भागाला बसला असून अनेकांची घरे पडली आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Maharashtra: Chief Minister Uddhav Thackeray and state minister Aaditya Thackeray visit Alibaug in Raigad district to take stock of the damages caused by #CycloneNirsaga. pic.twitter.com/MTF5lsSU1d
— ANI (@ANI) June 5, 2020
रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून नुकसानीची माहिती घेत नुकसान भरपाई म्हणून मुख्यमंत्र्यांकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करण्यात आल्याचे सांगितले होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून लकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल.