चिंबळी -खेड तालुक्याच्या दक्षिण भागात उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी सुरू केली आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या काळात मजुरांची टंचाई मोठ्या संख्येने भेडसावत असून बळीराजा चाकण, आळंदी, भोसरी येथील मजूर अड्ड्यावर मजुरांच्या शोधार्थ जात आहेत.
एखादा मजूर मिळाला तर 300 रुपये मजुरी देत ने-आण व जेवण्याचा खर्च उचलत त्याच्याकडून शेतातील भुईमूग काढून घेतले जात आहे.
कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, मरकळ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, गहू पिकाची काढणी केल्यानंतर टोकन पद्धतीने भुईमूग पिकाची पेरणी केली होती.