श्रीनगर -भारत-पाकिस्तान सीमेवर आज चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.तर या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात गुरी भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा जवानांना त्यांच्या गुप्तचरांकडून मिळाली. त्यामुळे त्या गावाला सुरक्षा दलांनी वेढा दिला. त्यावेळी जवानांवर गोळीबार करून या दहशतवाद्यांनी तेथून पळ काढण्याच्या प्रयत्न केला,त्यावेळी झालेल्या चकमकीत हे दोन दहशतवादी ठार झाले.
Based on the intelligence input that terrorists were taking the civilian inmates of a house in Changimulla, Handwara of Kupwara district hostage, a joint operation was launched by Army and JK Police: Army Spokesperson on Handwara Operation in Jammu & Kashmir
— ANI (@ANI) May 3, 2020
वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, शहीदांमध्ये २१ राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अशुतोष शर्मा यांचा समावेश आहे. शर्मा यांचा यापूर्वी अनेक यशस्वी काउंटर टेररिझम मोहिमांमध्ये महत्वाची भुमिका राहिली आहे.