कोलकाता – सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विविध उद्योगधंदे ठप्प झाले आहेत तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपातीसह काहींना कमी करण्याचा विचार करत आहेत, ही बाब चिंताजनक आहे. परंतु सर्व गोष्टी या काळात नकारात्मक वाटत असल्या तरी दिलासा देणाऱ्याही घटना घडत आहेत. यात सध्या कोल इंडिया ही कोळसा उत्खनन क्षेत्रातील सरकारी कंपनी चालू वर्षात जवळपास 6000 जणांना नव्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही कंपनीकडून सुरू आहे.
कोल इंडिया आपल्या सहयोगी कंपन्यांमध्ये येत्या काळात मायनिंग सरदार, ओव्हरमॅन, सुपर व्हाइजर आणि सेफ्टी ऑफिसर यासारख्या पदांवर पात्रताधारक उमेदवारांची भरती करणार असल्याचे सांगितले आहे. एका वरी÷ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षात सहयोगी संस्थांमध्ये एकूण 1 हजारपेक्षा अधिकची नियुक्ती केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
आपल्या प्रकल्पामुळे ज्या लोकांचे स्थलांतर झाले आहे, अशा वर्गासाठीही येत्या काळात रोजगार देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. साथरोगाच्या संकटामुळं विविध राज्यांमधील नवीन प्रकल्प उभारण्याच्या कामामुळे जमीन अधिग्रहण आणि परियोजनांचा विस्तार मंदावल्यामुळे जे समस्यांमध्ये अडकले आहेत, त्यापैकी कंपनी 500 ते 600 जणांना रोजगार उपलब्ध करण्याची शक्यता आहे.