नवी दिल्ली – देशातील हॉकी स्पर्धा, संघ व खेळाडूंची निवड, स्पर्धेचे स्वरुप आणि त्याची रचना यांबाबत हॉकी इंडियाने आपल्या धोरणात मोठे बदल करणार असल्याचे जाहीर केले आहे.
देशातील जास्तीत जास्त खेळाडूंना सामिल करुन विविध राज्यांचे संघ व त्यांचे सामने तसेच हा खेळ तळागाळापर्यंत कसा नेता येईल याबाबत सध्या विचार विनिमय सुरु आहे. करोनामुळे देशांतर्गत स्पर्धांना खिळ बसली आहे. त्यामुळे करोनाचा निपटारा झाला की प्रत्यक्ष बदल केले जातील. खेळाचे स्वरुप काळानुरुप बदलले गेले पाहिजे, असे हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे.
भारतीय हकीचा राष्ट्रीय खेळ असा सार्थ गौरव केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत आपल्या संघाला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला आहे. एकेकाळी ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला तोड नव्हती आज तशी परिस्थिती नाही. हॉलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड व कोरिया यांविरुद्ध भारताला अनेक स्पर्धेत पराभव स्वीकारावे लागले होते.