मुंबई : राज्यात कोरोनाचे नवे बाधित ७२ पेक्षा अधिक सापडल्याने बाधितांच्या संख्येने ३०० चा टप्पा ओलांडला. मात्र यामुळे मुंबईतील परिस्थिती अधिक धोकादायक बनल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याच्या राजधानीत एका दिवसात तब्बल ५९ जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरमध्ये ३,पुणे,ठाणें, कल्याण,नवी मुंबई आणि विरारमध्ये प्रत्येकी दोंन बाधित आढळले आहेत
मुंबईत काल वरळी कोळीवाडा येथे परिसर सीलबंद करण्यात आला होता. मुंबईत बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने काळजीचे वातावरं निर्माण झाले आहे. यापुढे बाधित वाढू नयेत म्हणून घरी बसणे आवश्यक असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.