नवी दिल्ली – अत्यल्प गटासाठी 3 महिने 1 किलो डाळ मोफत मिळणार आहे. प्रत्येक गरीबाला 3 महिने 5 किलो अन्नधान्य मोफत देण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच संघटीत क्षेत्रातील कामगारांचा भविष्य निर्वाह निधी पुढचे 3 महिने सरकारतर्फे भरला जाणार आहे.
ज्यांचा पगार 15 हजारपेक्षा कमी आहे अशा कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी यात भरला जाणार आहे. 63 लाख महिला स्वयंसेवक समुहांना 20 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. संघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या पगारानुसार पीएफ सरकारतर्फे भरला जाणार आहे.