Nana Patole On PM Modi| लोकसभा निवडणूकांदरम्यान राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याचे विधान आपल्या भाषणादरम्यान केले होते. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
काय म्हणाले नाना पटोले ? Nana Patole On PM Modi|
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “मोदी घाबरले आहेत. त्यामुळे ते असे विधान करत आहेत. निवडणुकीच्या काळात पाकिस्तानची आठवण काढणं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच पाकिस्तानशी संबंध आहेत. ज्यांचा संबध असतो तेच लोकं पाकिस्तनाचा वारंवार विषय काढतात. नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानमध्ये जाऊन खाल्लेल्या बिर्याणीची आठवण येत आहे,” असे म्हणत पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला.
तसेच गेल्या 60 वर्षांमध्ये काँग्रेसने केलेल्या विकासानंतर भाजपने 10 वर्षात फक्त देश विकण्याचं काम केलं असल्याचे यावेळी नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानावर बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडीच्या 100 टक्के जागा पुढे असून, तिसऱ्या टप्प्यात देखील महाविकास आघाडी पुढे आहे आणि चौथ्या टप्प्यात देखील महाविकास आघाडी पुढे असल्याचे चित्र असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: