पोलिसांचा खडा पहारा :अत्यावश्यक सेवांचीच ये-जा सुरू
पुणे – करोनाचा सामना करण्यासाठी देशासह राज्यात हायअलर्ट ठेवण्यात आला आहे. रविवारी (दि.22) देशभरात “जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला होता. त्याला जनतेनेही चांगला प्रतिसाद दिला. यानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर करत कलम 144 म्हणजे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. यानंतर काही लोक विनाकारण घरातून बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले.
लोक घरात न थांबता स्वत:ची काळजी न घेता रस्त्यांवर येत आहेत, विनाकारण गर्दी करत आहेत. हे निदर्शनास आल्यावर आज (सोमवारी) राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली. तसेच सर्वच जिल्ह्यांचा सीमाबंदी करण्याचा आदेश दिला आहे. त्याचे पुणे जिल्ह्यातही तंतोतंत पालन करण्यात येत असून जिल्ह्यातील सीमांबंद करण्यात आल्या असून अत्यावश्यक सेवांना फक्त ये-जाण्याची परवागी देण्यात येत आहे.
प्रत्येक सीमेवर पोलिसांचा कडा पहारा आहे. पण, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहणार आहेत. अन्नधान्य, किराणा, मेडिकल, कृषी औषधे, बेकरी आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहणार आहे. आवश्यक गरजेवेळी व जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी लोकांनी आता बाहेर पडायचे आहे.