नवी दिल्ली – दिल्लीतील मौजापूर परिसरात हिंसाचार सुरु असतानाच राजघाटावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या अन्य नेत्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.
त्यानंतर केजरीवाल आणि दिल्लीच्या उपमुख्यमंत्री मनीश सिसोडिया यांनी हिंसाचारादरम्यान जखमी झालेल्या लोकांनी गुरु तेजबहादूर या रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
उत्तर दिल्लीतील गोकुलपुरी या परिसरात काही दंगलखोरांनी दोन अग्निशामक दलाच्या बंबाचं नुकसान केलं. दुसऱ्या दिवशीही या हिंसाचाराची तिव्रता कमी झाली नाही, असं पी.टी.आय या वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. संतापजनक बाब म्हणजे रस्त्यावरुन जात असणारी एक दुचाकी खेचून दंगलखोरांनी पेटवून दिली.
दरम्यान, हिंसाचारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर गेली आहे. हिंसाचारग्रस्त भागात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे.