नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली मागणी
नागपूर: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली. राम मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या महापुरुषांना भारतरत्न देण्याची मागणी तोगडिया यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
तोगडिया म्हणाले, बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस व गोरखपिठाधीस महंत अवैद्यनाथ या चार महापुरुषांचे राम मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान आहे. त्यांना भारत रत्नाचा मान दिला जावा.
दरम्यान त्यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारावर देखील भाष्य केले. केंद्राच्या अपयशामुळे देशातील महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचे तोगडिया म्हणाले.