माउंट माउंगनुई : भारतीय संघाने न्यूझीलंडविरूध्दच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी विजयी घेतली आहे. आज माउंट माउंगनुई ताॅरूंगा येथील बे ओव्हल मैदानावर मालिकेतील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा भारतीय संघाच्या बाजूने लागला आहे. कर्णधार रोहित शर्माने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#TeamIndia Captain @ImRo45 wins the toss and elects to bat first in the 5th T20I.#NZvIND pic.twitter.com/wriypfDO6v
— BCCI (@BCCI) February 2, 2020
दरम्यान, घरच्या मैदानावर रंगणा-या दोन संघामध्ये टी-२० मालिकेतील तीन किंवा पाचही लढती गमावण्याची नामुष्की न्यूझीलंड संघावर केव्हाच आलेली नाही. पण भारतीय संघ निर्भेळ यश मिळवत न्यूझीलंडवर ही नामुष्की आणून त्याच्या घरीच प्रथमच ०-५ असा ‘व्हाइट वाॅश’ देतो का, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.