मुंबई – मी कधी कल्पनाही केली नव्हती की भारतात असं काही होईल. कृपया हे देशाचं विभाजन करत असलेलं राजकारण थांबवा. हे देशात द्वेष पसरवणारं आहे. जर तुम्ही स्वतःला हिंदू समजत असाल तर हे लक्षात घ्या की हा धर्म आपल्याला धर्मासोबतच कर्माबद्दलही शिकवण देतो. हे जे चाललं आहे ते या दोन्ही पैकी एकही नाही. असं म्हणत बॉलिवूडअभिनेत्री सोनमकपूरनेशाहीन बागमध्ये करण्यात आलेल्यागोळीबारबाबतप्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान,शाहीन बागमध्ये गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं. सीएएआणि एनआरसीया कायद्याला विरोधाचं केंद्र झालेल्या शाहीन बागमध्ये गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली आहे. याबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.