मंगळरू : पाकिस्तानशी यापुढे चर्चा झाल्यास ती पाकव्याप्त काश्मिरबाबातच होईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सांगितले. देशात राष्ट्रीय नागरीकत्व सुची (एनआरसी)राबवणे आवश्यक असल्याच्या पक्षाच्या भूमिकेचा त्यांनी पुनरूच्चार केला.
एनआरसी राबवल्यामुळे देशाचे कायदेशीर नागरीक किती आहेत आणि घुसखोर किती रहात आहेत, ते समजू शकेल. तसे करण्याचा प्रत्येक देशाला हक्क आहे. देशात एनआरसी राबवण्यात कोणतीही हानी नाही, असे ते म्हणाले.
का कायदस्यामुळे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या नाहीत. मात्र या मुद्यावर सरकारला त्रास देण्याचा कोणी प्रयत्न करणार असेल तर ते खपवून घेणार नाही, असे त्यांनी सांगितले.