मुंबई – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्यश्री पुरस्काराची घोषणा केली आहे. त्यात ११८ जणांना पद्यश्री, १६ जणांना पद्यभूषण आणि ७ जणांना पद्यविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यात मुळ पाकिस्तानी गायक आदनान सामीलाही पद्यश्री जाहीर करण्यात आला आहे.
मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये,हे मनसे च ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 25, 2020
याच पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेचे ठाम मत आहे. २०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळाले आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढे लिफ्ट करण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित करत चित्रपट मनसेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करुन या पद्यश्री देण्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
दरम्यान, आदनान सामी हा हिंदी चित्रपटात गायक म्हणून आपली कारकिर्द घडविण्यासाठी मुंबईत आला. त्याचे ‘लिफ्ट करा दे’ हे गाणे प्रचंड गाजले होते. त्यानंतर त्याच्या वक्तव्यावरुन अनेकदा शिवसेना, भाजपा कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात काँग्रेस आघाडी सरकार असताना आंदोलने केली. असे असताना ४ वर्षापूर्वी मोदी सरकारने त्याला भारतीय नागरिकत्व दिले आहे. तर आता मुळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणाताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेचे ठाम मत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.