मुंबई – विधानसभा निवडणुकीत ‘१० रुपयात पोटभर जेवण’ हा मुद्दा चांगलाच गाजला होता. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र १० रुपयात जेवण देण्याचं आश्वासन दिलं होतं.
दरम्यान, ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेनं आपलं वचन पाळलं आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना १० रुपयात जेवण ही योजना महाराष्ट्रात राबण्यात येणार आहे. मात्र या गोरगरिबांना सवलतीच्या दरात भोजन देण्याच्या ठाकरे सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवथाळी’ योजनेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले असून ही अफवा असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
तत्पूर्वी, गोरगरिबांना सवलतीच्या दरात भोजन देण्याच्या ठाकरे सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवथाळी’ योजनेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. या अफवांवरून भाजप नेते राम कदम यांनी महाआघाडी सरकारवर निशाणा साधला होता.