मुंबई – नाताळाच्या सुट्टीनिमित्ताने देश-विदेशातील पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळाची निवड करतात. सुट्टीचा हंगाम सुरु असल्याने पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झालेले पाहायला मिळत आहेत.
भयानक आहे हे,
आणि हे रोज जगावं लागत,
ही वेळ दोषारोप करण्याची नाहीये तर खरोखरी मनापासून या सर्वांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याची आहे.भारतीय रेल्वे सक्षम आहेच.
केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रीत प्रयत्न करावे हीच तमाम मुंबईकरांच्या वतीने विनंती. https://t.co/2MDkSB4iv5— सुबोध भावे (@subodhbhave) December 25, 2019
यातच नाताळ सुट्टीच्या निमित्ताने मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी कल्याण-डोंबिवलीदरम्यान धीम्या-जलद मार्गांवर तब्बल पाच विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. सकाळी कामावर जाण्याच्यावेळी हा मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने रेल्वे फलाटावर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. सध्या या गर्दीचा डोंबिवली स्टेशनवरील व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. हा व्हिडिओवर अभिनेता सुबोध भावेने खंत व्यक्त केली आहे.
सुबोधने हा व्हिडिओ रिट्विट करत ‘भयानक आहे हे, आणि हे रोज जगावं लागतं’ असं म्हणत खंत व्यक्त केली आहे. यावेळी त्यांने नागरिकांच्या वतीने एक विनंतीही केली आहे. सुबोध म्हणतो ‘आणि हे रोज जगावं लागत, ही वेळ दोषारोप करण्याची नाहीये तर खरोखरी मनापासून या सर्वांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याची आहे. भारतीय रेल्वे सक्षम आहेच.
केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रीत प्रयत्न करावे हीच तमाम मुंबईकरांच्या वतीने विनंती.’