शरद पवारांकडून प्रकरणाची एसआयटीकडून चौकशीची मागणी
पुणे : एल्गार परिषदेतील भाषणांवरुन, त्यांनी सादर केलेल्या कवितांवरुन त्यांना देशद्रोही ठरवणे चुकीचे असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
NCP Chief Sharad Pawar: We will ask Maharashtra Chief Minister to form special investigation team (SIT) to properly investigate Bhima Koregaon case. pic.twitter.com/TFvCZOKS7c
— ANI (@ANI) December 21, 2019
कवितेतील दोन ओळींसाठी त्यांना तुरुंगात डांबून ठेवणे चुकीचे आहे. या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करुन लोकांना तुरुंगात ढकलले आहे. याची चौकशी करायला हवी. त्यांनी मूलभूत स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. याची चौकशी व्हायला हवी. पुणे पोलिसांचे वागणे अत्यंत आक्षेपार्ह आहे, असे म्हणत सरकारने याप्रकरणी निवृत्त अधिकाऱ्यांची, निवृत्त किंवा विद्यमान न्यायमूर्तींची एसआयटी नेमावी, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर तत्कालीन सरकारने सत्तेचा गैरवापर केला की नाही याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.