उत्तरप्रदेश, दिल्लीत जमावबंदी :बिहारमध्ये रेल्वे रोको
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात गुरुवारी देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. डावे पक्ष आणि मुस्लिम संघटनांनी हा बंद पुकारला असून, बंदवेळी कोणतीही अनूचित घटना घडू नये, यासाठी देशात सर्व ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर निर्दशकांचा वाढ रोष पाहता उत्तरप्रदेश आणि दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Delhi: Section-144 of the Code of Criminal Procedure (prohibits assembly of more than 4 people in an area) has been imposed near Red Fort. #CitizenshipAct pic.twitter.com/xFI1WsfOO4
— ANI (@ANI) December 19, 2019
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी या सर्व पक्षांनी देशात सर्व कार्यालयांमध्ये गुरुवारी सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकता नोंदणी या विषयांवरून निदर्शने करण्यास सांगितले. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ जमावबंदी लागू करण्यात आली असून बिहारमध्ये आंदोलकांकडून राजेंद्र नगर स्टेशनजवळ रेल्वे रोको करण्यात आली आहे. कर्नाटकातही बंदला प्रतिसाद, बंगळुरूमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजधानी नवी दिल्लीमध्ये सात मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले असून दिल्लीत डाव्या पक्षांच्या मोर्च्याला परवानगी नाकारली आहे.