नगर – स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत यावर्षी 177 प्रस्ताव नगरच्या कृषी निभागाने पाठविले आहेत.यातील केवळ 66 लाभार्थींना या योजनेचा लाभ होणार असून उर्वरित प्रकरणे मंजूर होण्याच्या प्रक्रियेत आहेत.
अपघातानंतर शतेकऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त होवू नये म्हणून सुरू करण्यात आलेल्या या विमायोजनेत 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यांना सदभागी होता येते. यात अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई,अपघाताने दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये, एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते.
रस्ता ,रेल्वे अपघात,पाण्यात पडून मृत्यु,विषबाधा, विजेचा धक्का,वीज पडून मृत्यु, सर्पदंश,विंचुदंश,खून ,उंचावरून पडणे,नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्याने होणारे अपघाती मृत्यु,दंगली होणारे मृत्यु, या ंमुळे मृत्यु झाल्यास याविमा योजनेद्वारे विमा योजनेत सहभागी असणाऱ्यांना लाभ होवू शकतो.
अपघाती मृत्यु आल्यास अथवा अंपगत्व आल्यास संपूर्ण 13 कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्याकडे प्रस्ताव द्यावा.कंपनी कडून शहानीशा झाल्यानंतर विमा कंपनी संबधित शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा करते. जिल्हा कृषी विभागाने यावर्षी एकुण 177 प्रस्ताव विमा कंपनी कडे पाठविले होते त्यापैकी 66 प्रस्ताव मंजूर झाले असून,8 प्रस्ताव रद्द ठरविण्यात आले आहेत . तर 61 प्रस्ताव विमा कंपनी कडे मंजूरीच्या प्रक्रियेत आहेत.