नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात राज्याच्या 13 विधानसभा मतदारसंघात 37 लाख 83 हजार 55 मतदार 189 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. या टप्प्यात पहिल्यांदाच 1,05822, नवे मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करणार आहेत. झारखंडमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 27.41 % मतदान पार पडल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
27.41% voting recorded till 11 am. Voting on 13 constituencies in the state for the first phase of elections is underway. #JharkhandAssemblyPolls https://t.co/gcZsgleHvB
— ANI (@ANI) November 30, 2019
राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागले आहे. गुमला जिल्ह्यातील बिश्नूपुर इथेली पूल नक्षलांनी उडवला. सुदैवाने कोणीही जखमी नाही. मतदानावर परिणाम होणार नाही असं उपायुक्त शशी रंजन यांनी केले स्पष्ट आहे.
मतदानास सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहिल. निवडणूक आयोगाने मतदानासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. नक्षलप्रभावित या सर्व विधानसभा मतदारसंघात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सीमावर्ती भाग सील करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेचे भाजप अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादापासून राज्याला मुक्त करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.