मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय नाट्य संपल्यानंतर गुरुवारी (दि.२८) शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. मात्र, उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाला भाजप नेते राम कदम यांनी टोला लगावला आहे.
राम कदम म्हणाले, “पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी होईल अशी आमची अपेक्षा होती परंतू दुर्दैवाने तसं होताना दिसलं नाही”. असं ते म्हणाले.