पिंपरी – नेहरूनगरमधील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. यामुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला असून नागरिकांना चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी अद्यापही पालिका कर्मचारी आले नाहीत. दरम्यान, शहरातील नागरिकांना समान पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.