मुंबई : राज्यातील सत्तापेच हा आज एका महत्वपूर्ण टप्प्यावर येवून थांबला आहे. आज राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र या घडामोडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे फुटलेले आमदार आता परत येताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले तीन आमदार परत आल्याचे सांगण्यात आहे. अनिल पाटील दौलत दरोडा आणि नरहरी झिरवळ असे परतणाऱ्या आमदारांची नावे असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.
एकीकडे अजित पवार यांच्याकडे 27 आमदारांचे पाठबळ असल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे अजित पवारांसोबत गेलेले सर्वच आमदार परत येत आहेत. त्यामुळे राज्यात सध्या संपुर्णपणे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी हे तीन आमदार राजभवनात हजर होते असे सांगण्यात येत आहे.
तसेच अजित पवारांच्या शपथविधीला साहेबांचा पाठिंबा असल्याचे वाटले म्हणून आम्ही राजभवनात गेलो असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितल. दरम्यान, आता राष्अ्रवादीचे दोनच आमदार परत येण्याचे बाकी आहेत एक म्हणजे पिंपरी चिंचवडचे अण्णा बनसोडे तर दुसरे खुद्द अजित पवार. या दोघांना परत आणण्यासाठी पक्षाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत असताना दिसत आहेत.