नगर – जिल्हा परिषदेच्या संरक्षण भिंतीशेजारी असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कणखर भूमिका घेतलेली आहे. यामुळे अतिक्रमणधारकांनी आता दुसरीकडील पर्याय निवडून तेथून आपले स्थलांतर केलेले आहे. 40 पैकी फक्त आता 15 अतिक्रमणे राहिलेली आहे.
जिल्हा परिषदेच्या संरक्षण भिंतीजवळ सुमारे खाद्यविक्रेते, फळविक्रेते आदी 40 जणांनी अतिक्रमण करून आपले दुकाने थाटली होती. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी ही अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात भूमिका घेऊन बंद असलेले प्रवेशद्वार दोन सुरु केले. हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने आपली कणखर भूमिका कायम ठेवल्याने संरक्षण भिंती लगत असलेल्या विक्रेत्यांनी आता आपली दुकाने थाटण्यासाठी इतरत्र मार्ग शोधला आहे.
40 व्यवसायिकांपैकी फक्त आता 15 जण येथे तळठोकून आहेत. या अतिक्रमणधारकांचीही हकलपट्टी करण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पाऊले उचलेली आहेत. जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्याभरातून अभ्यागत व अधिकाऱ्यांचा कायमच राबता असतो. त्यामुळे चारचाकी वाहने उभी करण्यास जिल्हा परिषदेच्या आवारात जागा राहत नाही. त्यामुळे आता त्यावर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने मार्ग काढला.