नवी दिल्ली : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. रांचीपासून जवळपास 40 किलोमीटर दूर जंगलात ही चकमक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.
Jharkhand Chief Minister Raghubar Das: I salute the sacrifice of the two Jaguar jawans who lost their lives in the encounter today. Naxalism is breathing its last in Jharkhand and we will only rest when we eradicate it completely. (File pic) https://t.co/2GwOLDFaAh pic.twitter.com/YxKM3feioI
— ANI (@ANI) October 4, 2019
चकमकीत झारखंड जग्वारचे दोन जवान शहीद झाले, शिवाय अन्य जवानही जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. रांचीचे एसएसपी अनीश गुप्ता, डीआयजी एवी होमकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जवानांना नक्षलवाद्यांच्या ठिकाण्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार परिसरात शोधमोहीम राबवली जात होती. दरम्यान लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात दोन जवान शहीद झाले तर अन्य जवान जखमी झाले. जवानांकडूही नक्षलवाद्यांना चोख प्रतित्युत्तर देण्यात आले आहे.
या घटनेवर मुख्यमंत्री रघुवर दास यांनी प्रतिक्रिया दिली. मी त्या दोन जवानांना सलाम करतो, जे आज नक्षलवाद्यांशी लढत असताना शहीद झाले. झारखंडमध्ये नक्षलवाद आपली शेवटची घटका मोजत आहे. नक्षलवादाचे मुळासकट उच्चाटन केल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार असल्याचे मत यावेळी दास म्हटले आहे.