पेठ – सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात यंदाच्या हंगामात झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. परिसरातील सर्व पाण्याचे स्त्रोत भरले असून वेळ नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत.
सातगाव पठार भागातील पारगाव, कुरवंडी, पेठ, भावडी, कुदळेवाडी, कोल्हारवाडी, थुगाव आदी गावांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील ओढे-नाले खळाळू लागले आहेत. तसेच विहिरीदेखील भरल्या आहेत.
वेळेश्वर डोंगरावर उगम पावणाऱ्या वेळ नदी पात्रातील सर्व बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत.
गेले तीन त चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे बहुतांशी शेतात पाणी साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बटाटा काढणीस सुरवात केली नव्हती. आता पावसाने उसंत दिल्यामुळे बटाटा काढणीच्या कामांना वेग आला आहे.